
|| श्रीविद्या अखंडमहायोग ||
श्रीविद्याअखंडमहायोग ही अध्यात्म मार्गातील अति प्राचीन अशी योग परंपरा आहे. हठ्योगापासून ते मंत्रयोगापर्यंत व इतरही सर्व साधनांना एकात्मिक व समन्वित स्वरुपात प्रगट करते. युगा-युगा पासून चालत आलेली ही दिव्य बोध परंपरा सांप्रत काळी श्री सद्गुरुदेव श्रीनिवासजी काटकर पुढे नेत आहेत.
दिव्य श्री माता, ती आपल्या मुलांवर विनाअट प्रेम करते.
तिचे दैवी बिनशर्त प्रेम अनुभवण्यासाठी आपण, तिच्या मुलांनी, पूर्ण अहंकाररहित शरणागतीने तिच्यावर बिनशर्त प्रेम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
- श्रीगुरुदेव

श्री गुरुदेव
प्रा. श्रीनिवास शामराव काटकर, त्यांच्या प्रशंसक, भक्त आणि शिष्य यांच्यात श्रद्धेने श्रीगुरुदेव म्हणून ओळखले जातात, ते एक महायोगी आणि एक महान तत्वज्ञ आहेत. आध्यात्मिक गुरु म्हणून ते श्रीविद्यामहायोगाच्या व्यावहारिक शास्त्रामध्ये पात्र, अध्यात्मिक साधकांचा वर्ग, जात, भाषा आणि लिंग विचारात न घेता मार्गदर्शन करीत आहेत. श्री गुरुदेव हे दिव्य आध्यात्मिक प्रेरणा आणि खर्या आधुनिक युगातील शाश्वत स्त्रोत आहेत.
श्रीविद्याअखंडमहायोग

आमच्या सद्गुरूनाथांच्या रूपाने आविष्कृत झालेले सच्चीदानंदाचे अनंत प्रज्ञान आणि अनंत निष्कामप्रेम हेच आमच्या जीवनाचे एकमेव प्रेरक व्हावेत हि प्रार्थना, औम.

आगामी कार्यक्रम

पुस्तके
भगवानश्रीमहाकालभैरवरहस्यप्रकाश - 1
भगवानश्रीमहाकालभैरवरहस्यप्रकाश 1 - या पहिल्या भागामध्ये 'ज्ञानखंड' आणि 'चर्याखंड' अथवा 'उपासनाखंड' अशा दोन उपविभागांमधून पूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजी शामराव काटकर यांनी भगवान श्रीमहाकालभैरव देवतेसंबंधी रहस्यमय माहिती प्रकट केलेली आहे. ग्रंथाच्या या पहिल्या भागातील ज्ञानखंडामध्ये पूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजींनी भगवान श्रीमहाकालभैरवांच्या प्रमुख अशा साठ नावांचा गुह्यार्थ स्पष्ट करणारे विवरण लिहिले असून ते विवरण गूढार्थबोधिनीटीकेच्या स्वरूपात या प्राथमिक ज्ञानखंडामध्ये समाविष्ट केलेले आहे. या गूढार्थबोधिनीटीकेच्या माध्यमातून पूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजींनी भगवान श्रीमहाकालभैरवांच्या आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक स्वरूपांवर विशेष प्रकाश टाकलेला आहे.
त्रिपुरारहस्य - ज्ञानखंड रहस्यार्थप्रकाश भाग 3
त्रिपुरारहस्य हा ग्रंथ भगवान श्रीदत्तात्रेय आणि त्यांचे शिष्योत्तम भगवान श्रीभार्गव जामदग्न्य परशुराम यांच्यामध्ये झालेल्या अध्यात्मिक संवादावर आधारलेला आहे. या ग्रंथाच्या ज्ञानखंडावर श्रीगुरुदेव श्रीनिवासजींनी सलग पंधरा वर्षे प्रवचने दिली. या प्रवचनांना संकलित करून त्यातील काही प्रवचने या 'रहस्यार्थप्रकाश- महाभाष्य’ या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहेत. भगवान श्रीदत्तात्रेय शिष्यभाव धारण केलेल्या भार्गव परशुरामांना चितशक्ती श्रीविद्येच्या निर्गुण आणि सगुण अर्थात परसूक्ष्म आणि स्थूल स्वरुपांवर प्रकाश टाकणारा उपदेश करण्यास प्रारंभ करतात. उपदेशक्रम चालू असताना मधून मधून भगवान श्रीभार्गव परशुराम विनम्र जिज्ञासेने प्रश्न करतात आणि भगवान श्रीदत्तात्रेय त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागतात असा वरील दोनही सुश्रेष्ठ अवतारी महात्म्यांमध्ये झालेल्या प्रश्नोत्तरांमधून जो संवादक्रम प्रगट झाला तोच हा त्रिपुरारहस्य ग्रंथ होय.
त्रिपुरारहस्य - ज्ञानखंड रहस्यार्थप्रकाश भाग 2
त्रिपुरारहस्य हा ग्रंथ भगवान श्रीदत्तात्रेय आणि त्यांचे शिष्योत्तम भगवान श्रीभार्गव जामदग्न्य परशुराम यांच्यामध्ये झालेल्या अध्यात्मिक संवादावर आधारलेला आहे. या ग्रंथाच्या ज्ञानखंडावर श्रीगुरुदेव श्रीनिवासजींनी सलग पंधरा वर्षे प्रवचने दिली. या प्रवचनांना संकलित करून त्यातील काही प्रवचने या 'रहस्यार्थप्रकाश- महाभाष्य’ या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहेत. भगवान श्रीदत्तात्रेय शिष्यभाव धारण केलेल्या भार्गव परशुरामांना चितशक्ती श्रीविद्येच्या निर्गुण आणि सगुण अर्थात परसूक्ष्म आणि स्थूल स्वरुपांवर प्रकाश टाकणारा उपदेश करण्यास प्रारंभ करतात. उपदेशक्रम चालू असताना मधून मधून भगवान श्रीभार्गव परशुराम विनम्र जिज्ञासेने प्रश्न करतात आणि भगवान श्रीदत्तात्रेय त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागतात असा वरील दोनही सुश्रेष्ठ अवतारी महात्म्यांमध्ये झालेल्या प्रश्नोत्तरांमधून जो संवादक्रम प्रगट झाला तोच हा त्रिपुरारहस्य ग्रंथ होय.